आमदार श्री.सुभाष देसाई यांची विधानसभेतील भाषणे या पुस्तकात एकत्र प्रकाशित करण्यात आली आहेत.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आग्रहाप्रमाणे सर्व उमेदवारांचे कार्य सामान्य माणसापर्यंत पोचले पाहिजे.श्री.सुभाष देसाई हे त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांशी नेहमीच बांधील राहीले आहेत.हे पुस्तक जनसामान्यांपर्यंत पोचण्याचे एक माध्यम आहे.त्यांचे त्यांच्या मतदारसंघातील व बाह्य भागातील काम नेहमीच प्रशंसनीय राहीले आहे.या पुस्तकातून त्यांची मतदारांबद्दलची कृतज्ञता व विधानसभेत बोलण्याचा आदर्श समोर येतो.. |