श्री. सुभाष देसाई ज्येष्ठ नागरिकांना अनुभवाचा खजिना समजतात त्यांच्यामते हा खजिना समाजाने व्यवस्थित सांभाळला पाहिजे. ज्येष्ठ लोकांची काळजी घेणे हे फक्त त्यांच्या कुटुंबियांचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. ज्येष्ठ लोकांकडुन मिळणारा अनुभव तरुणांसोबत विभागणे गरजेचे आहे. ज्येष्ठ लोकांची या वयात काळजी घेणे गरजेचे आहे. श्री. सुभाष देसाई यांनी गोरेगाव मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना मोफत व सहज ज्येष्ठ नागरिक पत्र पुरवण्याचा प्रकल्प श्री. देसाई यांनी यशस्वीपणे राबवला आहे. १००० पेक्षा अधिक लोकांनी या प्रकल्पातुन लाभ उचलला आहे. ही योजना पुर्ण वर्षभर सुरु असते. फक्त अर्जासोबत छायाचित्र व वय पुरावा सादर करुन वृद्ध नागरिक हे ‘ज्येष्ठ नागरिक पत्र’ प्राप्त करु शकतात. श्री. सुभाष देसाई यांचे कार्यालय धारक संबधित कागदपत्रे बोरिवली कार्यालयात सादर करण्याची तसदी घेतात व न्यायालयीन शुल्क शिक्का प्रक्रीया वगैरे पूर्ण करतात आणि लॅमिनेटेड ओळखपत्र ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोफत पोचवले जाते.
|