|
 |
| शालेय शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान यांच्या उच्चशिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व मान्य करतानाच आपल्या सांस्कृतिक शिकवणी व ऐतिहासिक मूल्यांचे महत्व देखील उद्याच्या पिढीच्या शिक्षणात समाविष्ट करणे अपरिहार्य आहे. तरच आपली उद्याची पिढी सर्वांगिण दृष्ट्या सुशिक्षित व सुविचारी असेल. श्री. सुभाष देसाई सुरुवातीपासुनच गोरेगावकरांच्या सांस्कृतिक भरभराटीसाठी प्रयत्नशील आहेत. समयोचित कार्यक्रमांद्वारे त्यांनी संतांची आचार - शिकवण तसेच ऐतिहासिक महापुरुषांचे विचार व ऐतिहासिक मूल्ये लोकांपर्यंत पोंचविण्यासाठी आजपर्यंत त्यांनी अनेकाविध भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन यशस्वीपणे केले आहे. सदर कार्यक्रमांद्वारे गोरेगावच्या शिरपेचात मानाचा तुराच खोवला गेला आहे. आपला आदरणीय ईतिहास आणि संतांची मौल्यवान शिकवण ही त्यांच्याकडून गोरेगावकरांना मिळालेली अमुल्य भेट असून हे कार्यक्रम नागरिकांच्या शैक्षणिक ज्ञानात उच्च नितीमूल्यांची भर टाकतात. भव्यदिव्य समर्थ उत्सव, नेत्रदीपक सावरकर उत्सव, सांस्कृतिक मुंबई उत्सव हे सुभाष देसाई यांनी आयोजित केलेल गोरेगावकरांच्या ज्ञानच्या कक्षा रुंदावणारे काही उत्सव! |
|