| |
"लोकप्रतिनीधी कसा असावा याबाबत कै.
जयवंत टिळक हे म्हणत -
1. He should be loyal to his party.
2. He should be loyal to his constituency.
3. He should be loyal to his state.
4. Over and above he should be loyal to humanity and lastly,
5. He should be loyal to his own self.
कै. टिळक यांनी सांगितलेले सर्व
निकष श्री. सुभाष देसाई
यांच्याबाबतीत
पूर्णपणे लागू होतात.
म्हणूनच वागणुकीत संयमी, भाषणात अभ्यासु आणि कृतीने निष्ठावंत असणारा हा शिवसेनेचा नेता शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे आणि कार्याध्यक्ष श्री. उध्दव ठाकरे यांना विश्वासार्ह वाटतो.
गोरेगाव भागातून श्री. सुभाष देसाई दोन वेळा विधानसभेवर निवडून आले. शिवसेनेचे नेते आणि सरचिटणीस म्हणून त्यांनी चांगले काम केलेच, परंतु त्याचबरोबर शिवसेनेचे दोन्ही महत्वाचे प्रश्न - मराठी माणसांचे आणि हिंदुत्वाचे, त्यांनी सामना, दोपहर का सामना आणि मार्मिक यामधुन सतत जनतेसमोर मांडले. गोरेगाव भागातील प्रबोधन क्रीडाभवन, प्रबोधन जॉगर्स पार्क, ओझोन जलतरण तलाव, मीनाताई ठाकरे रक्तपेढी आणि करियर मार्गदर्शन केंद्र म्हणजे सामाजिक कामाच्या उंच ध्वजा आहेत. म्हणुनच गोरेगाव विधानसभा मतदार संघातील त्यांचे काम विधानसभागृहाबाहेर आणि विधानसभागृहात गौरवास्पद आहे.
शिवसेनेची शिबिरे, अभ्यासवर्ग, सभा, मेळावे यांत नेमके मार्गदर्शन करण्याबाबत सर्व श्री. सुभाष देसाई यांना ओळखतात. विधानसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनी आमदार म्हणून प्रश्नोत्तराचा तास, स्थगन प्रस्ताव, विधेयक, लक्ष्यवेधी सूचना, तारांकित प्रश्न या सर्व आयुधांचा वापर समर्पक पधतीने केला. श्री. सुभाष देसाई यांनी कधी लक्ष्यवेधी सूचना देऊन तर कधी स्थगन प्रस्ताव देऊन तसेच काहीवेळा औचित्याचा प्रश्न उपस्थित करुन तर काही वेळा तारांकित प्रश्नांद्वारे लोकांच्या व्यथा विधीमंडळाच्या वेशीवर टांगल्या आहेत.
आमदार जर आभ्यासू असेल, विचारवंत असेल, कर्तबगार असेल तर सरकारला कसे शरण आणतो याचे उदाहरण म्हणजेच श्री. सुभाष देसाई. " |
|
|
| |
|
|
|
|